Explore

Search

April 17, 2025 4:40 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन कार्यालयाचे आवाहन

सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे लष्कर पाणी पुरवठा केंद्रामार्फत पुरवठा होणाऱ्या ग्राहकांकडे 5 हजार किंवा त्यापेक्षा जास्त पाणी  देयक थबाकी आहेत, अशा सर्व ग्रहाकांनी पाणी देयके 15 डिसेंबर पर्यंत भरावीत, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन उपविभाग क्र. 1 चे उपविभागीय अभियंता यांनी केले आहे.

थकबाकी भरणार नाहीत अशा ग्राहकांची नळजोडणी बंद करण्याची कार्यवाही 16 डिसेंबर पासून सुरु करण्यात येणार आहे.  तसेच अवैधरित्या (प्राधिकरणाची मंजूरी न घेता) नळजोडणी करुन घेतली आहे अशांनी प्राधिकरण कार्यालयात त्वरीत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व डिपॉझिट भरुन अवैध नळजोडणी वैध करुन घ्यावी, असेही प्राधिकरणाकडून कळविण्यात आले आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy